सीएसआरडीचा पूरग्रस्त शेतकरी बांधवांसाठी “कृषक संजीवनी” उपक्रम

मदतकार्य व समुपदेशनासाठी ‘डी-स्ट्रेस हेल्पलाईन’ कार्यान्वित – साहित्य संकलनाचे आवाहन   अहिल्यानगर | प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, शेतमजूर व त्यांच्या कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरांची छप्परे उडाली, धान्यसाठे वाहून गेले, जनावरांची जीवितहानी झाली, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य व दैनंदिन जगण्याच्या वस्तू पाण्याबरोबर वाहून गेल्या. या संकटात अन्नदाता शेतकरी बांधव अक्षरशः हतबल झाले…