माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेची दुहेरी कामगिरी; सलग दोन वर्षांत ११ कोटींचा राज्यस्तरीय गौरव
अहिल्यानगर | प्रतिनिधी राज्य शासनाच्या माझी वसुंधरा ५.० अभियानांतर्गत आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत अहिल्यानगर महानगरपालिकेला सलग तिसऱ्या वर्षी पहिल्या तीन क्रमांकामध्ये स्थान मिळाले आहे. ३ ते १० लाख लोकसंख्येच्या गटात महानगरपालिकेला ५ कोटी रुपयांचे तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. यापूर्वी माझी वसुंधरा ४.० अभियानातही महानगरपालिकेला राज्यात द्वितीय क्रमांक मिळवत ६ कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला होता….
