विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे – दादासाहेब गीते; आयएमएस विद्यार्थ्यांचा पूरग्रस्तांसाठी उपक्रम
अहिल्यानगर | जैनवार्ता पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना ओळखून त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना “विद्यार्थ्यांनी सामाजिक भावना जपण्यास पुढे आले पाहिजे,” असे प्रतिपादन जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांनी केले. अहिल्यानगर येथील आयएमएस व्यवस्थापन संस्था वतीने करंजी गावातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला ॲड. गोरख पालवे, करंजी गावचे…
