‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण; अहमदनगर महाविद्यालयात सामूहिक गायनाने गुंजला देशभक्तीचा सूर
अहिल्यानगर | जैनवार्ता ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने अहमदनगर महाविद्यालय, अहिल्यानगर येथे सामूहिक गायनाचा भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. विद्यार्थी विकास मंडळ, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय एकात्मतेचा प्रसार आणि सकारात्मक सामाजिक…
