टीईटी वादावर महाधिवक्त्यांचा सल्ला घ्यावा – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी

अहिल्यानगर | प्रतिनिधी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळ आणि गैरसमजांमुळे शिक्षकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी शासनाने तातडीने महाधिवक्त्यांचा सल्ला घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात माजी शिक्षक आमदार तथा शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,…

नवीन शैक्षणिक धोरणाचा स्विकार करुन शिक्षकांनी अपडेट व्हावे – संध्याताई गायकवाड; अहमदनगर एज्युकेशन सोसायटी गुणवंतांचा गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)  “इंटरनेटमुळे शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील अंतर कमी झाले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवणे अत्यावश्यक आहे, कारण विद्यार्थी शिक्षकाकडे आदर्श व्यक्ती म्हणून पाहतात,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड यांनी केले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे माजी प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ…

भाकप, किसान सभेचे राज्यभर रास्ता रोको आंदोलन; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७० हजार मदतीची मागणी

मुंबई | प्रतिनिधी राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांचे अतिवृष्टी व पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. पक्षाची राज्य कार्यकारिणी व जिल्हा सचिवांची बैठक नुकतीच ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड हिरालाल परदेशी होते. मागील दोन महिन्यांपासून विशेषतः…

शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी हेच संस्थेचा आत्मा- रामचंद्र दरे; जिल्हा मराठाचा दसरा महोत्सव उत्साहात साजरा

अहिल्यानगर | प्रतिनिधी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचा दसरा महोत्सव उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. संस्थेच्या स्थापनेपासून सुरु असलेली ही परंपरा आजही तितक्याच जोशात टिकवली जात असून, सामाजिक परिवर्तन आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्यात आले. संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतर्फे अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत रक्कम जमा करण्यात…

जिल्हा मराठा,दसरा महोत्सव,

पांगरमल गावात नुकसानीचे पंचनामे सुरू; भीमराज आव्हाड यांचे उपोषण स्थगित

नगर | प्रतिनिधी नगर तालुक्यातील पांगरमल गावात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असतानाही गावात पंचनामे न झाल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. ग्रामसेविका वारंवार गैरहजर राहत असल्याच्या तक्रारींवरून पांगरमलचे माजी सरपंच भीमराज आव्हाड यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकत शेतकऱ्यांसह उपोषणास सुरुवात केली. यावेळी पांडुरंग आव्हाड,…

गांधी, शास्त्री जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

अहिल्यानगर (प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील निमगाव वाघा ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत, स्व. पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सरपंच…

विभागीय आयुक्तांचा निर्णय : शिक्षक बीएलओ कामापासून दूर

अहिल्यानगर : शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ ) या निवडणूक विषयक निरंतर चालणाऱ्या अशैक्षणिक कामातून पूर्णपणे वगळण्याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्त नाशिक यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने २४ जून २०२५ रोजी दिले होते .याच निवेदनानुसार विभागीय आयुक्तांनी २५ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक,धुळे,जळगाव,अहिल्यानगर व नंदुरबार या जिल्हाधिकारी यांना संबंधित शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती…

आनंद पार्श्व गुरुकुल नेत्र तपासणी शिबिर संपन्न; १४० विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

अहिल्यानगर | प्रतिनिधी श्री आनंद पार्श्व गुरुकुल येथे आनंद नवकार परिवार ट्रस्ट, महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषी म. सा. व संस्कार प्रेमी प. पू. आलोकऋषी म. सा. यांच्या आशीर्वादाने, तसेच डॉ. सुधा प्रकाश कांकरिया व साई सूर्या नेत्र सेवा यांच्या सहकार्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थी…

डॉ. अभय बंग यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्याची सुवर्णसंधी : ‘जगावं कशासाठी व कसे?’ विषयावर ‘आरोग्यसदन’चा संवाद

अहमदनगर | प्रतिनिधी मानवी जीवनाला दिशा दाखवणारे आणि ग्रामीण आरोग्य सेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या पद्मश्री डॉ. अभय बंग यांना प्रत्यक्ष ऐकण्याची दुर्मिळ संधी नगरकरांना उपलब्ध होत आहे. ‘जगावं कशासाठी व कसे?’ या विषयावर त्यांचा संवाद रविवारी ता. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत हॉटेल संजोग, मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर येथे आयोजित करण्यात आला…

आनंदनगर परिसरात रंगला भोंडल्याचा पारंपरिक उत्सव, शहरातील आनंदनगरात आदिशक्ती महिला मंडळाचा पुढाकार; कार्यक्रमातून महिला शक्तीचा जागर, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचा प्रयत्न

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने भोंडलाचा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील पारंपारिक संस्कृतीची ओळख जपण्यासाठी आणि महिलांमध्ये एकोपा वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या आरतीने करण्यात आली. नटून-थटून पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक गाणी, नृत्य, विनोदी खेळ, तसेच संवादाच्या…