आनंदधाममध्ये पू श्री विदिताजी म सा यांची 19 मे रोजी मोठी दीक्षा सोहळा

अहिल्यानगर | प्रतिनिधी राष्ट्रसंत आचार्य सम्राट प पू श्री आनंदऋषिजी महाराज साब यांच्या पावन उर्जेने ओतप्रोत असलेल्या आनंदधाम येथे 13 मे रोजी श्रीमती विजयाजी प्रकाशचंदजी कोचर (वय 67) यांनी संसार मोहाचा त्याग करून जैन भागवती दीक्षा ग्रहण केली. ‘करेमि भंते’च्या पाठाद्वारे त्यांनी संयमी जीवनात प्रवेश केला असून आता त्यांचे साध्वी जीवन पू श्री विदिताजी म…

विजयपथाचा मार्ग स्वीकारत विजया कोचर यांची जैन भागवती दीक्षा उद्या

अहिल्यानगर | प्रतिनिधी मानवी जीवनातील शाश्वत सुखाचा मार्ग हा भोगोपभोगात नसून त्याग आणि संयमात दडलेला असल्याचे जैन धर्मात सांगितले जाते. सद्गुरूंच्या सानिध्यातून वैराग्याची जाणीव झाल्यानंतर अनेक जण संयम साधनेचा मार्ग स्वीकारतात. भगवान महावीर स्वामी यांनी सांगितलेल्या अहिंसा, सत्य आदी पाच महाव्रतांचे पालन करत संसाराचा त्याग करून मोक्षप्राप्तीकडे वाटचाल करण्यासाठी जैन भागवती दीक्षेला विशेष महत्त्व आहे….

समता शिरोमणी उपाधीने प पू श्री कुंदनऋषिजी म.सा. यांचा गौरव; आनंदधाम येथे ६५वा दीक्षादिन महोत्सव उत्साहात

अहिल्यानगर | प्रतिनिधी राष्ट्रसंत आचार्य सम्राट प पू श्री आनंदऋषिजी म सा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आनंदधाम येथे आचार्य भगवंतांचे ज्येष्ठ सुशिष्य, मौनसाधक महाश्रमण प पू श्री कुंदनऋषिजी म सा यांचा ६५वा दीक्षादिन महोत्सव चतुर्विध संघाच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी त्यांना “समता शिरोमणी” या उपाधीने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरण, नवकार महामंत्र जाप…

प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म.सा. यांच्या 64 व्या दीक्षादिनानिमित्त आनंदधाम येथे गुणानुवाद सभेचे आयोजन

अहिल्यानगर | प्रतिनिधी  राष्ट्रसंत आचार्य सम्राट प पू श्री आनंदऋषिजी म सा यांच्या परिसस्पर्शाने पावन बनलेल्या आनंदधाम येथे अविरत जैन साधू-संतांच्या आगमनामुळे श्रावक-श्राविकांना सतत गुरु दर्शन व सत्संगाचा लाभ मिळत असतो. त्याचबरोबर आचार्य भगवंत यांचे ज्येष्ठ शिष्यरत्न व महाराष्ट्र प्रवर्तक श्री कुंदनऋषिजी म सा यांच्या वास्तव्यामुळे श्रद्धाळू भक्तांना गुरु आशिर्वादाची विशेष प्राप्ती होत असल्याची भावना…

त्रिवेणी संगमातून अक्षय पुण्यप्राप्तीचा योग; आनंदधाम येथे वर्षीतप पारणा सोहळा

अहिल्यानगर | प्रतिनिधी वैशाख शुध्द तृतीया, म्हणजे अक्षय तृतीया जैन धर्मा प्रमाणे हिंदू धर्मातही या दिवसाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी केले जाणारे सत्कार्य अनंत गुणा फलप्राप्ति देते. तसेच हा दिवस साडे तीन मुहुर्तां पैकी एक मुहुर्त आहे. जैन धर्मीयांचे प्रथम तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांच्या तपसाधनेमुळे अक्षय तृतीयेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मोक्षप्राप्तीसाठी…

प्रभू येशू ख्रिस्ताची प्रेम, नम्रता आणि सेवाभावाची शिकवण अंगीकारा – बिशप रेमसन व्हिक्टर मौदी गुरुवार निमित्त अहमदनगर पहिली मंडळी सी.एन.आय. चर्चमध्ये प्रभुभोजन विधी भक्तीभावात संपन्न

अहिल्यानगर | प्रतिनिधी ख्रिस्ती श्रद्धेत अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा मौदी गुरुवार हा दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसोबत घालवलेल्या शेवटच्या क्षणांची आठवण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी येशू ख्रिस्ताने प्रेम, सेवा आणि नम्रतेचा आदर्श घालून देत शिष्यांचे पाय धुऊन एकमेकांवर प्रेम करण्याचा संदेश दिला. तसेच, शिष्यांसोबत शेवटचे भोजन करून प्रभुभोजन विधीची स्थापना केली. या…

साधु-संतांच्या सानिध्यात गुढीपाडवा; आनंदधाम येथे नववर्ष मंगलमय प्रारंभ

अहिल्यानगर | प्रतिनिधी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रात नववर्षाच्या स्वागताचा उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराच्या प्रारंभाचा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जात असल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. वसंत ऋतूच्या आल्हाददायक वातावरणात नवचैतन्य आणि आनंदाचा दुग्ध-शर्करा योग अनुभवायला मिळतो. याच पार्श्वभूमीवर आनंदधामच्या पवित्र प्रांगणात साधु-संतांच्या…

भटक्यांच्या पंढरी’ मढीत श्रद्धेचा महासागर; आठ लाख भाविकांनी घेतले कानिफनाथ महाराजांचे दर्शन

पाथर्डी | नितीन गटाणी ‘भटक्यांची पंढरी’ म्हणून देशभर प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या मुहूर्तावर श्रद्धेचा महाकुंभ भरला. ‘कानिफनाथ महाराज की जय’, ‘अलख निरंजन’ आणि ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषात महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सुमारे आठ लाख भाविकांनी श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. रंगपंचमीच्या दिवशी कानिफनाथ महाराजांनी संजीवन समाधी…

शिवरायांच्या इतिहासाला रंगांची उधळण; विभागीय चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

संगमनेर | नितीनचंद्र भालेराव छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून हिवरगाव पावसा येथील कला सम्राज्ञी पवळा कला मंच यांच्या वतीने आयोजित विभागीय स्तरीय चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगमनेर, अकोले, राहुरी आणि नगर जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीने कागदावर रंगांची उधळण करत ही स्पर्धा गाजवली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक…

मराठी पुस्तकांचा आवाज आता मोबाईलवर; ‘श्रोता’ अ‍ॅप सर्वांसाठी उपलब्ध

अहिल्यानगर | प्रतिनिधी मराठी भाषा दिनानिमित्त, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधत ‘श्रोता’ हे मराठी ऑडिओबुक अ‍ॅप २७ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी मोफत उपलब्ध करण्यात आले आहे. कृषीरंग प्रकाशनच्या माधुरी सचिन चोभे यांनी याबाबत माहिती दिली. आधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आणि साहित्याचा संगम घडवणारे हे अ‍ॅप मराठी वाचक-श्रोत्यांसाठी नवे डिजिटल व्यासपीठ ठरणार आहे. अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवरील Google Play…