आनंदनगर परिसरात रंगला भोंडल्याचा पारंपरिक उत्सव, शहरातील आनंदनगरात आदिशक्ती महिला मंडळाचा पुढाकार; कार्यक्रमातून महिला शक्तीचा जागर, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा जतन करण्याचा प्रयत्न

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात आदिशक्ती महिला मंडळाच्या वतीने भोंडलाचा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील पारंपारिक संस्कृतीची ओळख जपण्यासाठी आणि महिलांमध्ये एकोपा वाढवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या आरतीने करण्यात आली. नटून-थटून पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक गाणी, नृत्य, विनोदी खेळ, तसेच संवादाच्या…

गुगलचा वाढदिवस : डिजिटल क्रांतीचा महोत्सव

  अहमदनगर | प्रतिनिधी २७ सप्टेंबर हा दिवस जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांसाठी खास आहे. कारण आजच्याच दिवशी जगाला माहितीचा महासागर खुला करून देणाऱ्या ‘गुगल’चा वाढदिवस साजरा केला जातो. १९९८ साली स्टॅनफर्ड विद्यापीठातील दोन तरुण संशोधक – लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन – यांनी सुरू केलेल्या या सर्च इंजिनने केवळ शोध प्रक्रिया बदलली नाही, तर आधुनिक जगाची…

महाराष्ट्र शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार विद्या भडके यांना प्रदान शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव

अहिल्यानगर | प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे श्री शिवाजी हायस्कूल बोधेगाव (ता. शेवगाव) येथील शिक्षिका विद्या रामभाऊ भडके यांना मुंबईत गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भडके यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री…

महाराष्ट्र

जिल्हाधिकारी निवास प्रवेशद्वार चिखलमय; महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; साथीचा रोग पसरण्याची भीती

अहिल्यानगर | प्रतिनिधी महानगरपालिकेच्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे जिल्हाधिकारी निवासाच्या प्रवेशद्वाराची अवस्था अक्षरशः दयनीय झाली आहे. दक्षिण दिशेचे स्टेशनरोडवरील प्रवेशद्वारासमोर खड्डे, चिखल, माती, कचरा व साचलेल्या पाण्याने भरून गेला आहे. परिणामी जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हे निवासस्थानच जणू एखाद्या दुर्गम भागातील रस्त्यासारखे वाटू लागले आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे येथे पाणी साचून चिखल राडारोडा तयार झाला आहे. या ठिकाणी…

घर घर लंगर सेवेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात करंजीतील 16 पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्‍यक साहित्य वाटप

पंजाबनंतर आता जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आधार देण्याचे कार्य सुरु; आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी लंगर सेवा अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आपत्तीच्या काळात मदतीला धावून जाणाऱ्या गुरू अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठान संचलित घर घर लंगर सेवा ने पाथर्डी तालुक्यातील करंजी गावातील पूरग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. अलीकडील पुरामुळे करंजी येथील 16 घरे पूर्णपणे वाहून गेली असून, कुटुंबीयांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत….

केडगाव रेणुका माता मंदिरात घटस्थापना उत्साहात; शेतकऱ्यांसाठी देवीला साकडे

नवरात्रोत्सवाचा उत्साह : केडगाव रेणुका माता मंदिरात घटस्थापना भाविकांचे श्रद्धास्थान – रेणुका मातेला साकडे घालून शेतकऱ्यांच्या उन्नतीची प्रार्थना अहिल्यानगर (प्रतिनिधी): नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी केडगाव येथील रेणुका माता देवी मंदिरात घटस्थापना व महाआरतीचा सोहळा अतिशय धार्मिक वातावरणात पार पडला. या वेळी मंदिर परिसर भक्तांच्या जयघोषाने, ढोल-ताशांच्या गजराने आणि फुलांच्या सजावटीने दुमदुमून गेला. हा सोहळा प्रवीण कोतकर…

पंडित दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त जिल्ह्यात विविध स्पर्धांचे आयोजन

अहिल्यानगर | प्रतिनिधी   पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा लोककल्याणकारी आदर्श जीवनपट आणि राष्ट्रासाठी दिलेले योगदान युवकांना समजून घेता यावे आणि त्यातून युवकांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी त्यांच्या जयंती निमित्त गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व चौदा तालुक्यात महाविद्यालयीन निबंध, वक्तृत्व आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. समितीच्या वतीने युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी…

लाडकी बहीण योजनेचे मानधन सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य : जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Ladki Bahin Yojana E-KYC:महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर सुरुवातीपासूनच विरोधकांनी सडकून टीका केली होती. तरीही या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा झाल्याचे दिसून आले. यानंतर आता या योजनेची छाननी सरकारकडून सुरू झाली असून, लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. २६.३४ लाख लाभार्थींचे मानधन तात्पुरते रोखले महिला…

जैन मंत्र, यंत्र आणि तंत्राद्वारे अरिहंत उपासना व आत्मसाधना सेमिनार

अहिल्यानगर | प्रतिनिधी महावीर मेरा पंथ आणि Jainmantras.com तर्फे दोन दिवसीय सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. आत्म साधक श्री सुरेंद्रकुमार राखेचा (सूरत)होणाऱ्या या सेमिनारचा उद्देश भक्तीद्वारे भौतिक आणि आत्मसमृद्धी साधणे हा आहे. हा सेमिनार “जैन मंत्र, यंत्र आणि तंत्राद्वारे अरिहंत उपासना आणि आत्म साधना” या विषयावर आधारित असून, यात सहभागी होणाऱ्यांना अध्यात्मिक साधनेसह जीवनात संतुलन…