Politics | सरकारच्या अल्पमदतीवर शेतकऱ्यांचा रोष; सामनगावात भाकपचा रास्तारोको”

शेवगाव | जैनवार्ता (Politics) अतिवृष्टी आणि पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सामनगाव येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षासह किसान सभेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी “शेतकऱ्यांचा अपमान आम्हाला मान्य नाही!”, “प्रतिहेक्टर सत्तर हजार मदत द्या!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. (Politics) गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाच्या आकडेवारीनुसार…

मोफत उद्योजकता प्रशिक्षण; युवक-युवतींना व्यवसाय उभारणीची संधी

अहमदनगर | प्रतिनिधी जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, अहिल्यानगर आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वसाधारण घटक व विशेष घटक योजनेअंतर्गत तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विविध व्यावसायिक क्षेत्रांतील प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यात डाटा एन्ट्री…

जागतिक अंध दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम; रुग्णांना राहण्याची व जेवणाची मोफत सोय

अहमदनगर | प्रतिनिधी जागतिक अंध दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने शुक्रवार, दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी मोफत नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू, काचबिंदू आणि तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर नगरदेवळे येथील संत सावता महाराज मंदिरात सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत पार पडणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष…

जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगरला राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कार्याचा मान

अहिल्यानगर | (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर येथे नुकतेच पार पडलेल्या जायंट्स वेल्फेअर फाउंडेशन फेडरेशन 2 बी च्या राज्यस्तरीय अधिवेशनात जायंट्स ग्रुप ऑफ अहिल्यानगरला सामाजिक कार्याबद्दल सर्वोत्कृष्ट कार्याचे प्रथम पारितोषिक जाहीर करून सन्मानित करण्यात आले. तसेच, जायंट्स वेल्फेअर फाउंडेशनचे स्पेशल कमिटी सदस्य संजय गुगळे यांना सर्वोत्कृष्ट पब्लिसिटी अवॉर्ड प्रदान करण्यात आला. ग्रुपचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी ही…

टीईटी वादावर महाधिवक्त्यांचा सल्ला घ्यावा – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे मागणी

अहिल्यानगर | प्रतिनिधी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळ आणि गैरसमजांमुळे शिक्षकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करण्यासाठी शासनाने तातडीने महाधिवक्त्यांचा सल्ला घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात माजी शिक्षक आमदार तथा शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे,…

गुंदोजमध्ये 733 वर्षे जुने रोहिणी माता मंदिर : गोडवाड परिसरातील आस्थेचे केंद्र

रोहिणी माता मंदिर पाली : पाली जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर गोडवाड प्रदेशातील सिंहद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुंदोज गावात 733 वर्षांपूर्वी स्थापन झालेले रोहिणी माता मंदिर आजही ग्रामस्थांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे. या भव्य मंदिरात पाच मूर्ती आहेत — त्यापैकी प्रमुख रोहिणी माता, जगदंबा माता आणि अंबा माता यांच्या आहेत, तर दोन लहान मूर्ती ब्राह्मणी…

नवीन शैक्षणिक धोरणाचा स्विकार करुन शिक्षकांनी अपडेट व्हावे – संध्याताई गायकवाड; अहमदनगर एज्युकेशन सोसायटी गुणवंतांचा गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)  “इंटरनेटमुळे शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील अंतर कमी झाले आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण आणि दैनंदिन जीवन यांची सांगड घालणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवणे अत्यावश्यक आहे, कारण विद्यार्थी शिक्षकाकडे आदर्श व्यक्ती म्हणून पाहतात,” असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या (माध्यमिक) शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड यांनी केले. अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे माजी प्रमुख कार्यवाह स्व. अशोकभाऊ…

भाकप, किसान सभेचे राज्यभर रास्ता रोको आंदोलन; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ७० हजार मदतीची मागणी

मुंबई | प्रतिनिधी राज्यातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कारागीर यांचे अतिवृष्टी व पुरामुळे झालेले प्रचंड नुकसान लक्षात घेऊन, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. पक्षाची राज्य कार्यकारिणी व जिल्हा सचिवांची बैठक नुकतीच ऑनलाईन पद्धतीने पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड हिरालाल परदेशी होते. मागील दोन महिन्यांपासून विशेषतः…

शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी हेच संस्थेचा आत्मा- रामचंद्र दरे; जिल्हा मराठाचा दसरा महोत्सव उत्साहात साजरा

अहिल्यानगर | प्रतिनिधी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचा दसरा महोत्सव उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. संस्थेच्या स्थापनेपासून सुरु असलेली ही परंपरा आजही तितक्याच जोशात टिकवली जात असून, सामाजिक परिवर्तन आणि शिक्षण क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्यात आले. संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांतर्फे अतिवृष्टी व पुरग्रस्त शेतकर्‍यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत रक्कम जमा करण्यात…

जिल्हा मराठा,दसरा महोत्सव,

पांगरमल गावात नुकसानीचे पंचनामे सुरू; भीमराज आव्हाड यांचे उपोषण स्थगित

नगर | प्रतिनिधी नगर तालुक्यातील पांगरमल गावात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असतानाही गावात पंचनामे न झाल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. ग्रामसेविका वारंवार गैरहजर राहत असल्याच्या तक्रारींवरून पांगरमलचे माजी सरपंच भीमराज आव्हाड यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकत शेतकऱ्यांसह उपोषणास सुरुवात केली. यावेळी पांडुरंग आव्हाड,…