अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांसाठी पायाभूत सुविधा अनुदान; १४ नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अहिल्यानगर | जैनवार्ता धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासकीय मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका व नगरपरिषद शाळा तसेच अपंग शाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अनुदान योजनेंतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पेयजल, इन्व्हर्टर किंवा जनरेटर यांसारख्या सुविधा निर्माण…

TIFR च्या संशोधन बलूनचा प्रवास महाराष्ट्रात; अहिल्यानगर जिल्ह्यासह अनेक भागांना सतर्कतेचे निर्देश

अहिल्यानगर | जैनवार्ता हैदराबाद येथील टाटा मूलभूत संशोधन संस्था (TIFR) यांच्या वतीने ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वैज्ञानिक संशोधनासाठी हवेतील बलून उड्डाणे करण्यात येणार आहेत. या बलूनमधील काही उपकरणे अहिल्यानगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पडण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. या संशोधन उपक्रमाला भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग आणि…

MDS Examination डॉ. पूर्वा भंडारी यांचे एमडीएस परीक्षेत उल्लेखनीय यश; रूट कॅनाल तज्ञ म्हणून प्रथम क्रमांक

पाथर्डी | जैनवार्ता ( MDS Examination ) श्री तिलोक जैन विद्यालयाच्या माजी प्राचार्य स्व. बन्सीलाल भंडारी यांची नात आणि प्राचार्य अजय भंडारी यांची सुकन्या डॉ. पूर्वा अजय भंडारी हिने लोणी येथील रूरल डेंटल कॉलेजमधून एम.डी.एस. (रूट कॅनाल तज्ञ) ही परीक्षा प्रथम श्रेणीत, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय यश संपादन केले आहे.    डॉ.पूर्वा हिने यापूर्वी…

Diwali Celebration उत्कर्ष बालभवनला सेवाप्रीत फाउंडेशनकडून साऊंड सिस्टम भेट; ‘सामाजिक ऐक्याची दिवाळी’ साजरी

अहिल्यानगर | जैनवार्ता ( Diwali Celebration ) शिक्षण आणि सामाजिक जाणिवा दृढ करण्याच्या उद्देशाने सेवाप्रीत सोशल फाउंडेशनने दिवाळीच्या निमित्ताने स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनला साऊंड सिस्टमची भेट दिली. तसेच विद्यार्थ्यांना फराळ, चॉकलेट आणि शैक्षणिक साहित्य देत महिलांनी मुलांसोबत “सामाजिक ऐक्याची दिवाळी” आनंदात साजरी केली. मंगलगेट येथे प्रकल्प प्रमुख डॉ. सिमरन वधवा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात…

संजय गांधी निराधार योजनेला नवे डिजिटल रूप; मंजुरी आदेश थेट घरपोहोच मिळणार

अहिल्यानगर | प्रतिनिधी कर्जत तहसील कार्यालयाने विकसित केलेल्या ‘निराधार मित्र’ या मोबाईल ॲपच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना अर्जस्थिती तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, मंजुरी आदेश थेट घरपोहोच मिळणार आहेत. त्यामुळे ही सेवा “राज्यातील प्रथम लाभार्थी ट्रॅकिंग व घरपोहोच आदेश सेवा” म्हणून राज्यासाठी आदर्श ठरत आहे. संजय गांधी निराधार सामाजिक अर्थसाहाय्य योजना ही निराधार…

मल्हारगडाच्या प्रतिकृतीस रुद्र शिंदेला प्रथम पारितोषिक

श्रीगोंदा | प्रतिनिधी तालुक्यातील मढेवडगाव येथे मावळा प्रतिष्ठाणतर्फे आयोजित “किल्ले बनवा” या स्पर्धेत जि.प. उंडेमळा शाळेचा विद्यार्थी रुद्र महेश शिंदे याने बनवलेल्या मल्हारगडाच्या प्रतिकृतीस इयत्ता चौथीत प्रथम क्रमांक मिळाला. इयत्ता तिसरी गटात अस्मिता प्रदीप उंडे हिने साकारलेल्या विजयदुर्ग किल्ल्यास प्रथम क्रमांक प्राप्त झाला. हर्षल मनोज सुपेकर (जंजिरा किल्ला) व लोकेश नवनाथ शिंदे (शिवनेरी किल्ला) यांनी…

स्व. ओमप्रकाश मंत्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘रुग्णोपयोगी साहित्य बँक’चे लोकार्पण

अहिल्यानगर (पाथर्डी ) | प्रतिनिधी सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत कोणत्याही वयोगटातील व्यक्तीच्या आरोग्याची हमी देता येत नाही. रुग्णोपयोगी साहित्य सहज उपलब्ध व्हावे या उद्देशाने ग्रामपातळीवर साहित्य बँका सुरू व्हाव्यात, असे मत जिल्हा माहेश्वरी सभेचे जिल्हाध्यक्ष मनीष बाहेती यांनी व्यक्त केले. जिल्हा सभेच्या पुढाकाराने माजी जिल्हाध्यक्ष स्व. ओमप्रकाश मंत्री यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘रुग्णोपयोगी साहित्य बँक’चे लोकार्पण करण्यात आले….

CTET 2026: 8 फेब्रुवारीला देशभर परीक्षा; CBSE कडून अधिकृत घोषणा

नवी दिल्ली | प्रतिनिधी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने CTET 2026 ची अधिकृत घोषणा केली आहे. 21वी आवृत्ती रविवार, ८ फेब्रुवारी 2026 रोजी घेण्यात येणार असून परीक्षा देशातील १३२ शहरांमध्ये विविध भाषांमध्ये आयोजित केली जाईल. परीक्षा दोन भागांमध्ये असेल — पेपर-I (इयत्ता 1 ते 5 साठी) आणि पेपर-II (इयत्ता 6 ते 8 साठी) —…

सिडनीत भारताचा सन्मानाचा विजय; रोहितचे शतक, कोहलीचे अर्धशतक

अहिल्यानगर | प्रतिनिधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने दमदार विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी केलेल्या ऑस्ट्रेलियाने 236 धावा केल्या आणि भारताने 9 विकेट्स राखून लक्ष्य गाठले. या विजयामुळे भारताने मालिकेचा शेवट सकारात्मक केला, जरी मालिका ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी रोखून धरत दडपणाखाली ठेवले. 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग…

जिल्हास्तर युवा महोत्सव ३ व ४ नोव्हेंबरला; सुप्त गुणांना मिळणार व्यासपीठ

अहिल्यानगर | प्रतिनिधी जिल्ह्यातील तरुणाईच्या सर्वांगीण विकासाला चालना देत सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि नवोन्मेष जपण्यासाठी दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यानुसार येत्या ३ व ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी दिली….